शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

बहुजन मूक बनल्याने इतिहासाची विकृती : अमोल मिठकरी --कागल येथे व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:45 IST

कागल : छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास समोर येत नाही कारण आम्ही बहुजन मूक बनल्याने आमच्या इतिहासाचे विकृतीकरण झाले, असे मत प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. अमोल मिठकरी यांनी मांडले.कागल येथील शिवशाहू विचारमंच आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त ...

कागल : छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास समोर येत नाही कारण आम्ही बहुजन मूक बनल्याने आमच्या इतिहासाचे विकृतीकरण झाले, असे मत प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. अमोल मिठकरी यांनी मांडले.कागल येथील शिवशाहू विचारमंच आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त हे व्याख्यान आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ होते.अमोल मिठकरी म्हणाले, संत तुकारामांच्या लेखणीतून शिवशाही निर्माण झाली, तर रामदासांच्या लेखणीतून पेशवाई उदयास आली. कवी परमानंदांनी छत्रपती शिवरायांवर पहिला ग्रंथ लिहिला. त्याचे नाव ‘शिवभारत’ होते. ‘शिव हिंदुस्थान’ असे नव्हते. शिवरायांनी किल्ल्यांवर गजशाळा, अश्वशाळा बांधल्या; मात्र गोशाळा नाही. अफझलखानाचा कोथळा तर काढलाच; पण त्याचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णीलाही ठार केले. त्याच अफझलखानाची कबर बांधली; पण कुलकर्णी याची नाही.यावेळी के. पी. पाटील, नगराध्यक्षा माणिक माळी, भैया माने, चंद्रकांत गवळी, युवराज पाटील, नवीद मुश्रीफ, राजू लाटकर, प्रकाश गाडेकर उपस्थित होते. गैबी चौकात झालेल्या या व्याख्यानास गर्दी झाली होती. प्रवीण काळबर यांनी स्वागत, तर नितीन दिंडे यांनी आभार मानले.राजकीय टीका-टिप्पणीमिठकरी म्हणाले, की आमचा बहुजनांचा ‘गण’ राक्षस गण असल्याने मंत्री चंद्रकांत पाटील ‘मी राक्षस आहे’ असे जाहीर करतात. आमच्याकडे इंद्र देव पूजला जात नाही; पण तरीही आमच्या डोक्यावर देवेंद्र, नरेंद्र आणि सगळे दारिद्र्य ठेवले आहे. तुम्ही किती वर्षे राम मंदिर बांधतो बांधतो म्हणून सांगत आलात; पण आमदार हसन मुश्रीफ यांनी कागलमध्ये राम मंदिर बांधून दाखविले आहे.वारसा सांगू नयेमिठकरी म्हणाले, ज्यांना नीट शिवाजी महाराज कळाले नाहीत, त्यांना ‘शाहू’ महाराज काय कळणार? ज्यांना छत्रपतींचे विचार जपता येत नाहीत त्यांनी ‘शाहूं’च्या रक्ताचा वारसा सांगू नये. हा रक्ताचा वारसा कितीजणांना माहीत आहे हे मला माहीत नाही; पण शाहूंच्या विचारांचा वारसा आम्हाला आहे. आमदार हसन मुश्रीफांना आहे आणि विचारांचा वारसा कधी बेईमान होत नाही.